शंका कुणा न आली की आत काय आहे
नुसतीच शाल भारी मी पांघरून गेलो!

कवटाळण्यास त्यांना गेले उठून सारे
खोलीमधे रिकाम्या मी चेंगरून गेलो

मज लागला कळाया एकेक शब्द त्यांचा
छे, मैफलीत त्यांच्या मी गांगरून गेलो



यातल्या कल्पना चांगल्या आहेत. गझल शक्य तितकी निर्दोष करावी.बाकीचे दोन शेर पुन्हा नव्याने लिहून चांगली गझल होऊ शकेल.

तीत इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळणे, नामाची क्रियापदे करणे. उंटावर मागे बसणाऱ्याला रदीफ म्हणतात, तर पुढे बसणाऱ्याला काय म्हणत असावेत? म्हणून यमकाच्या अगोदरही अविचल यमक वापरणे, असे अनेक प्रयोग(!) ह्या गझलेत केलेले दिसतील. क्षमस्व.

हे आपणच लिहिलेत हे चांगले झाले. असे 'प्रयोग ' गझलेसारख्या कसदार काव्यप्रकारात तरी होऊ नयेत असे वाटते.