मलादेखील वाटतो..अभिमान आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याचा. ....

मोठ्या प्रमाणावर असलेली गरीबी , शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आम्हालाही चटका लावणाऱ्या गोष्टी आहेत.

जे पी मॉर्गन यांचा लेख जागतिकीकरणाच्या लाटेत आलेल्या आर्थिक सुबत्तेवर नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेला तोंड देउन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याबाबत आहे.

आर्थिक सुबत्तेची किल्ली मुठभरांच्याच हाती आहे आणि धान्य पिकवणारा आमचा बाप फासाला लटकत आहे .......

सहमत. पण स्वतःच्या हिकमती वर उद्योग उभारून , नोकरीत गुणवत्ता सिद्ध करून मिळवलेली आर्थिक सुबत्ता आणि भ्रष्टाचारी ( राजकारणी , सरकारी नोकर ) यांची गैरमार्गाने आलेली आर्थिक सुबत्ता यांत नक्कीच फरक आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या बाबत आपले भ्रष्टाचारी राजकारणी , सरकारी नोकर जबाबदार आहेत असे नाही वाटत तुम्हाला?