अक्षरगणवृत्ता विषयी एक छान श्लोक आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितला होता तो असा
आदि मध्य अवसानेषु भजसा यांति गौरवम् ।
यरता लाघवम् यांति मनौतु गुरु लाघवम् ॥
या श्लोकात गण कसे पाडावेत हे सांगितले आहे. तीन अक्षरांच्या एका समूहास गण म्हणायचे

गुरू म्हणजे दीर्घ अक्षर आदि म्हणजे पहिले असेल ( म्हणजे बाकी दोन लघु) तर भ गण

------------ " ---- मध्य - ' --    मधले --"-- --------'" -----------  तर ज गण

------------"------अंत्य म्हणजे अवसानेषु म्ह.तिसरे ---" ----------"   तर स गण


लघू म्हणजे एकमात्रेचे अक्षर पहिले   बाकी दोन गुरु     तर य गण
____"--------------   मधले    --- "------         तर र गण
---------------"-------- अंतीम-----"-------      तर त गण
तिन्ही गुरू असतील तर  म गण
-------- " -----    तर  न गण     असे हे मनौतु गुरुलाघवम्

वृत्तांतील गणाविषयी त्याच वृत्तातील एक ओळ लक्षात ठेवायला त्यांनी सांगितले होते
जसे
य या या य येती भुजंगप्रयाती       म्ह. भुजंगप्रयात वृत्तात चार य गणच असतात ही ओळ त्याच वृतात आहे
किंवा
न न म य य गणांचे मालिनी वृत्त होते    ही ओळही त्याच वृत्तात
किंवा
ती ही वसंततिलका त भ जा ज गा गा   यात शेवटचा भाग दोन गुरू अक्षरांचा असतो ( गागा)
किंवा
ज सा ज स य ला ग हे गण तिलाच पृथ्वी म्हणा  शेवटचे एक अक्षर गुरु
किंवा
द्रुतविलंबित ना भ भ रा अशी
या वृत्ताच्या नावातच त्याची गती दर्शवली आहे म्ह. चालीत म्हटल्यास  द्रुत आणि  विलंबित  असे तीन तुकडे पडतात ज्या ठिकाणी यतिभंग होतो.
किंवा
जिच्या पादी येती य म न स भ ला गा शिखरिणी     यात शेवटचे गुरू आणि त्या आधीचे अक्षर लघू असते.