अक्षरगणवृत्ता विषयी एक छान श्लोक आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितला होता तो असा
आदि मध्य अवसानेषु भजसा यांति गौरवम् ।
यरता लाघवम् यांति मनौतु गुरु लाघवम् ॥
या श्लोकात गण कसे पाडावेत हे सांगितले आहे. तीन अक्षरांच्या एका समूहास गण म्हणायचे
गुरू म्हणजे दीर्घ अक्षर आदि म्हणजे पहिले असेल ( म्हणजे बाकी दोन लघु) तर भ गण
------------ " ---- मध्य - ' -- मधले --"-- --------'" ----------- तर ज गण
------------"------अंत्य म्हणजे अवसानेषु म्ह.तिसरे ---" ----------" तर स गण
लघू म्हणजे एकमात्रेचे अक्षर पहिले बाकी दोन गुरु तर य गण
____"-------------- मधले --- "------ तर र गण
---------------"-------- अंतीम-----"------- तर त गण
तिन्ही गुरू असतील तर म गण
-------- " ----- तर न गण असे हे मनौतु गुरुलाघवम्
वृत्तांतील गणाविषयी त्याच वृत्तातील एक ओळ लक्षात ठेवायला त्यांनी सांगितले होते
जसे
य या या य येती भुजंगप्रयाती म्ह. भुजंगप्रयात वृत्तात चार य गणच असतात ही ओळ त्याच वृतात आहे
किंवा
न न म य य गणांचे मालिनी वृत्त होते ही ओळही त्याच वृत्तात
किंवा
ती ही वसंततिलका त भ जा ज गा गा यात शेवटचा भाग दोन गुरू अक्षरांचा असतो ( गागा)
किंवा
ज सा ज स य ला ग हे गण तिलाच पृथ्वी म्हणा शेवटचे एक अक्षर गुरु
किंवा
द्रुतविलंबित ना भ भ रा अशी
या वृत्ताच्या नावातच त्याची गती दर्शवली आहे म्ह. चालीत म्हटल्यास द्रुत आणि विलंबित असे तीन तुकडे पडतात ज्या ठिकाणी यतिभंग होतो.
किंवा
जिच्या पादी येती य म न स भ ला गा शिखरिणी यात शेवटचे गुरू आणि त्या आधीचे अक्षर लघू असते.