वृषालीनी पाठवलेली पेटी निखिलला मिळाली की तो आपल्याकडचे अजून एक कुलुप
त्या पेटीला लावेल किल्ली आपल्याकडेच ठेवेल. वृषालीने लावलेले कुलुप तसेच राहील. मग तो ही दोन
कुलपं लावलेली पेटी परत घरी पाठवेल. मग वृषाली आपल्या किल्लीने तिने
लावलेले कुलुप काढून घेईल, आता निखिलने लावलेले कुलुप पेटीला उरेल. वृषाली
ही पेटी परत निखिल ला पाठवेल. मग तो आपल्याकडच्या किल्लीने राहिलेले कुलुप
उघडेल.
अर्थात ह्या उत्तरात असे गृहित धरले आहे की पेटीला एकावेळेला २ कुलुपे लावता येतील.