नुकताच नागपूर येथे इंडो-पाक मुशायरा झाला.  भारत आणि पाकिस्तानातील नामवंत शायर एकाच मंचावर होते. पाकिस्तानातून आलेल्या अहमद फराज ह्या माझ्या अतिशय आवडत्या महान कवीला प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली.  पाकिस्तानचे दुसरे नामवंत शायर मुस्लिम शमीम ह्यांचे मंचावर स्वागत करताना भारताचे मुनव्वर राणा म्हणाले,

"आज तक जो भी हुवा उसे भुला देना है
आज से तय है की तुमको भी दुवा देना है
आ मेरे यार फिर एक बार गले से लग जा
फिर कभी देखेंगे क्या लेना है क्या देना है"

मराठी अनुवाद-
झालेगेले कालचे ते सारे विसरून जायचे
आजपासुनी एकमेकां मैत्रीसंदेश द्यायचे
ये माझ्या मित्रा पुन्हा एकदा ऊरभेट घेऊ
पुढे कधी बघू काय घ्यायचे अन काय द्यायचे

ह्यावर उत्तर म्हणून मुस्लिम शमीम ह्यांनी भारताला उद्देशून काही शेर म्हटले--

"मिलना है तेरा जन्नत-ए-गुमगश्ता का मिलना
गंगा मेरी आंखों मे है जमुना मेरे अंदर

मौसम तेरी चाहत मे बयकवख्त कई है
शबनम मेरी पलकोंपे है सहबा मेरे अंदर

मुरली की मधुर धुन मे गझल सोच रहा हूं
अंगडाई कोई लेती है राधा मेरे अंदर"

मराठी अनुवाद-
मीलन तुझे जसे भटक्यास मिळावा स्वर्ग
नयनात गंगा माझ्या, यमुना अंतरात

ऋतू तुझ्या प्रेमात एकाच वेळी किती!
दंव पापणीवरी माझ्या, वारुणी अंतरात

मुरलीच्या मधुर सुरात गझल शोधतो मी
जागते आहे जणु राधा, माझिया अंतरात

(मराठी अनुवाद अगदीच घाईघाईत केला आहे.  चूकभूल झाली असल्यास क्षमस्व.)

पाकिस्तान तर दूर आहे, आपल्या इमारतीमधील सर्वच शेजाऱ्यांशी तरी आपले संबंध अगदी मधुर असतात काय? पण म्हणून काय शेजाऱ्याशी मारामारी किंवा बहिष्कार ह्याशिवाय दुसरा उपाय नाही?

द्वारकानाथजी, मी आपल्याशी सहमत आहे. इक्बाल असेल पाकिस्तानचा जनक. पण त्याचे शब्द तर स्वयंभूपणे हिंदुस्थानचे गुण गातात ना? चित्रकार आपले चित्र फाडून टाकू शकतो. पण कवीला आपलेच शब्द कसे नष्ट करता येतील? कागद फाडला तरी जे शब्द जनमनावर कोरले गेले आहेत ते कसे मिटवणार?

-राजेन्द्र