उगाच का पातळी सोडून बोलताय? तुम्ही ज्या प्रकारे बेसलेस विधानं केली आहेत त्यावरून माझं बोलणं तुमच्या जरा जास्तच जिव्हारी लागलंय हे स्पष्ट आहे. बिनबुडाचे आरोप केल्याने आणि दुसऱ्याला घालून पाडून बोलण्याने मुद्दा सिद्ध होत नसतो. मुद्दा मुद्द्याने खोडावा. ओरडल्याने आपलं म्हणणं खरं होत नाही.
मी लेखात एक तर नव्यानेच मराठी लिहू लागलेल्या माणसासाठी मराठी टाईप करणे सोपी गोष्ट नाहीये. असं लिहिलंय. आणि प्रतिसादात नव्याने मराठी लिहिताना खरंच अडचणी येतात. असं म्हटलंय. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्या तुम्हाला तुमच्या पूर्वग्रहदूषित मता मुळे वेगळ्या दिसत आहेत.
लिहिण्याचा सराव जमत नसेल तर, अंगठा तोंडात घेवून चोखत बसावे. अशी खालच्या दर्जाची वाक्य लिहून स्वतःच्या बुद्धीच वाजलेलं दिवाळं का जगजाहीर करताय? आणि असं लिहूनही वर लोकांनी आदर द्यावा अशी अपेक्षा असेलच. (हे अजून एक तुमच्या सारखं बेसलेस वाक्य.)
बाय द वे, आपला शुद्धिचिकित्सक तुमचा घेवून हा शब्द चुकीचा दाखवतोय. ही चूक तुमच्याकडून अनवधानाने झाली आहे की तो शब्द कसा लिहितात हे तुम्हाला माहिती नाहीये? की आपला शुद्धिचिकित्सक चुकीची चूक दाखवतोय?
'समजून घ्या, समजून घ्या' असा गळा का काढलाय? दिवे घ्या.
असा गळा मी अजिबात काढलेला नाहीये. उलट तुम्ही काही समजून घ्यायला आता ह्या पुढे इथे मी नवीन लिखाणच करणार नाहीये.