कथा अतिशय सुंदर आहे. पाचवीतल्या मुलाच्या नजरेतून जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला लावतो.
तपशीलात काही त्रूटी आहेत असे वाटले. म्हणजे ही कथा मोठ्या माणसाने आपल्या आठवणी सांगाव्यात अशी वाटत नाही. कारण बऱ्याच वेळा निवेदन बाळबोध (म्हणजे वाईट नव्हे. "विचार" लहान मुलांच्या विचारांप्रमाणे) वाटले आणि लहान मुलाचे निर्व्याज कथनही वाटत नाही, कारण वापरलेली "भाषा" ही मोठ्या माणसाची वाटते. शिवाय ते पेन अजूनही त्या मुलाकडे आहे, म्हणजे ही भूतकाळातली गोष्ट आहे. त्यामुळे वाचताना थोडा गोंधळ उडाला.
श्री. कोहम ह्यांच्या वरील मताशी सहमत.