आणखी चांगला प्रयत्न करायला हवा असे तुम्हाला नाही वाटत?
छंदोबद्ध कविता केल्यानेच कविता चांगल्या होतील असे नाही, पण जर तशा करता आल्या तर नक्की प्रयत्न करावे.
"मनाशी मन जूळले की झाली कविता" हे वाक्य छान आहे.. पण..
"शब्दाला शब्द जोडले की झाली कविता" याशी बाकीची सर्व वाक्ये प्रतारणा करत नाहीत काय? या वाक्यातून उपरोध व्यक्त होतो पण पुढील वाक्ये निराळा संदर्भ दर्शवितात. उदा. "कवि मनाला जागें केले की झाली कविता" याचा भावार्थ वेगळा नाही काय?
अर्थात् हे माझे मत. चू. भू. द्या. घ्या.