हे खरेतर विषयांतर आहे. पण कालच्या (बहुधा पुढारीत) वृत्तपत्रात एक बातमी वाचली. नक्की संदर्भ आठवत नाहीत, पण बहुधा सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी परिसरात अशाच एका वळूने गोंधळ केला. त्याला पकडण्याची विनंती ग्रामस्थांनी पोलिसांना केली. तेव्हा पोलिसांनी तो अमानवी असल्याने आम्हांला पकडता येणार नाही असे उत्तर दिले व वनाधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगितले. वनाधिकाऱ्यांनी वळू हे पाळीव जनावर असल्याने (वन्यपशू नाही म्हणून ) "आमच्या कक्षेत येत नाही " असे सांगून त्याला पकडण्यास नकार दिला. अखेर ग्रामस्थांनीच त्याला पकडायचे ठरविले आणि पाठलाग चालू केला. या पाठलागाने पळून पळून दमलेला वळू अखेर गतप्राण झाला. काय म्हणायचं यावर?
अवधूत.