"आई-वडील घरी नसतांना गर्लफ्रेण्डला घरी कसे बोलवाल? काय काय उपाय योजाल? सांगा फोन करून!"
होय! स्पर्धेच्या नावाखाली दिवसा विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांपैकीच हा वरील प्रश्न. हा एका FM रेडीओवर विचारण्यात आला होता. असे काहीही प्रश्न विचारले जातात. आणि देणारेही उत्तरे अफलातून देतात. पण ती देणाऱ्यांचे प्रमाण व देणारे लोक जर खरे मानले तर नक्की हे चिंताजनक आहे.
एकदा दिवसा एका FM रेडीओवर विचारले होते:
"पुरुषांना प्रश्न- समजा तुम्ही चुकून स्त्रीयांसाठीच्या टॉयलेटमध्ये घुसले आणि नंतर लक्षात आल्यावर घाईघाईने बाहेर यायला निघालात आणि तुमचा मोबाईल गडबडीत त्या टॉयलेटमध्येच राहीला तर तुम्ही मोबाईल परत मिळवण्यासाठी काय कराल? सांगा अम्हाला फोन करून."
काय कप्पाळ अपेक्षा ठेवणार अशा रेडीओंकडून नैतिकतेची वगैरे?
रात्री तर एका FM वर लव्ह गुरू वगैरे सारख्या कार्यक्रमांत अगदी सरळ सरळ नैतिकता धाब्यावर वसवून (किंवा पोतडीत गुंडाळून समुद्रात फेकून देवून) कुणीतरी विचारलेल्या काहीही प्रश्नांना अगदी काहीही उत्तरे दिली जातात. सरळ सरळ हायस्कूलच्या मुलामुलींना एकमेकांशी शरिरसंबंधाला परवानगी देणारी- त्यात काहीच वावगे नाही असे वाटण्याइतपत खुलेपणा असणारी (किंवा एकमेकांना एकांतात कसे भेटायचे याचे उपाय सांगणारे मार्गदर्शन) उत्तरे असले गुरू देतात. थांबायला पाहीजे हे सगळे. हायस्कूल आणि कॉलेजची मुलेच हे जास्त ऐकतात. त्याचा परिणाम भयंकर आहे.
म्हणे आम्ही प्रेमाचे प्रश्न सोडवतो!
आपल्यापैकी कुणालाही नकीच असली प्रश्न ऐकून नक्कीच संताप आला असेल. अजून कुणी यासंदर्भात काही सांगा. काय वातते आपल्याला हे असले ऐकून?