सध्या सकाळी ७ ते ११ जर कुणी रेडिओ मिरची ऐकत असेल तर त्यांनाही हे कदाचीत वाटत असावे....
सध्या मिरची म्युजिक गुरू नावाचा कार्यक्रम १५ दिवस चालू असणार आहे ज्यात हिच आदिती रोज एका गीतकार/संगीतकार/गायक अशा कुणाचीतरी मुलाखत घेणार आहे/ घेत आहे.... मुळात मी मुंबई ची आहे.... मला रोज असे वाटते आहे की ह्या मुलाखती मी आधी ऐकल्या आहेत. तिकडे असे अनेक शो चालत असत.... रादर ही संकल्पना आधी मुंबई रेडिओ सिटी मध्ये चालत होती ती आता ह्यांनी ढापली असावी.....
तुम्ही जर तो कार्यक्रम नीट ऐकला तर लक्षात येईल की तिने विचारलेल्या प्रश्नावर तो उत्तर देतो आहे असे वाटत नाही.... तिचा प्रश्न मुलाखतीमध्ये डबिंग करून टाकल्यासारखा वाटतो.... म्हणजे दुसय्रा कुणीतरी घेतलेली मुलाखत हे वापरत आहेत असे.... आणि प्रश्न हिच्या आवाजात परत डब केल्यासारखे.... असे वाटण्याचे अजून एक कारण म्हणजे ती प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी आर्टीफिशली हसते..... (ती तर तिच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या कोणत्याही जाहीरातीत सुद्धा काही शब्दांना विनाकारण आर्टीफिशली हसते) त्यामुळे ती खरे प्रश्न विचारते असे वाटत नाही.....
मुख्य म्हणजे ह्यांनी म्युजिक गुरू ची जाहीरात केली (कार्यक्रम सुरू करण्याआधी) तेव्हा मुलाखतीतली काही वाक्य जाहीरातीत वापरली(मठ्ठ्पणाचा कळस. उदाः मै हु टायटल साँग, हे वाक्य शंकर - एहसान- लॉय च्या मुलाखतीत होते जी ३री किंवा ४थी होती.... पण ए. आर. रेहमान ची पहिली मुलाखत झाल्यावर हे वाक्य जाहिरातीत होते.) जर मुलाखती पुढच्या आठवड्यापासून घेणार आहेत तर ती वाक्ये आधी कशी आली????
प्रेक्षकांना मूर्ख समजून काहीही केले तरी चालते असाअ ऍप्रोच असावा असे वाटते.