लेख आवडला.

दरवर्षी जगातून सहाशे भाषा नष्ट होत असतील तर भारतातून किती याचे उत्तर काढता येईल का?

परकर पोलके नि नऊवारी साडी सारखी मराठी सणासुदीची भाषा होणार हे पचवायला मला अवघडच वाटते आहे.

मराठी भाषा अनेक कुटुंबात आजही सणासुदीची किंवा आजी-आजोबांशी बोलण्याची भाषा झाली आहे. जितक्या लवकर हे पचवावे तितके बरे असे वाटते नाहीतर आपण आपल्याच कंफर्ट झोनात सुखी आहोत असे तरी समजून घ्यावे.

"इतिहास, संस्कृती सगळं वाहत्या नदीसारखं आहे." खिडकीपलिकडच्या न दिसणार्‍या नदीकडे हात करत त्या म्हणाल्या. "थांबून उपयोग नाही."

आजीबाई सूज्ञ आहेत. त्यांचे थोडेसे शहाणपण इतरांनाही येवो. ;)