...कारण कार्यक्रम खरंच खुप छान असतो. प्रसन्न वाटते. त्यांनी केलेला मराठी माणसाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न आहे तो!गाण्यांचा क्रम आणि निवड ही डोके वापरून केलेली असते असे वाटले, ते ऐकतांना! आधी सुरूवातीला थोडी जुनी, मग नवी भक्तिगीते... मग चित्रपटांतली देवांची गाणी याप्रमाणे!

आणि मध्ये मध्ये छान मराठी आवाज येतो, "आपण ऐकत आहात, मिर्ची झुंजू मुंजू "... छान आवाज आहे तो.