होय
खरे आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला साहित्य संमेलनाची गरज नव्हती आणि नाही. मात्र साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक पुस्तके पुनर्प्रकाशित केली जातात. पुस्तकांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे अशा संमेलनांचा नॉमिनल फायदा नाकारता येत नाही. मराठी साहित्य महामंडळ नक्की काय काम करते हे मला माहीत नाही त्यामुळे त्याची गरज आहे की नाही हे सांगता येत नाही.
नाही. मराठी साहित्य समृद्ध होण्याचा साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही.
होय. या संमेलनासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या कराच्या पैशातून महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान देण्यात येते. जर हे अनुदान देण्यात येत असेल तर हे संमेलन महाराष्ट्रातच होणे योग्य आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील लहान-मोठ्या प्रकाशकांना त्यांची पुस्तके येथे प्रदर्शनात मांडता येतील. पुस्तकांची खरेदी विक्री होईल. झालेच तर महाराष्ट्रातील केटरर्स, वडापाव, चहाकॉफीच्या गाड्या यांचीही थोडीफार उलाढाल होईल. गाद्या, चादरी, खुर्च्या, लाऊडस्पीकर्स यांचाही थोडा व्यवहार होईल. स्टार माझा, झी २४ तास, साम वाहिनी वगैरे वाहिन्या स्वस्तात थेट प्रक्षेपणे दाखवू शकतील. एकंदर महाराष्ट्रात पैसा खेळता राहील. त्यामुळे हे संमेलन महाराष्ट्रातच (निदान बृहन्महाराष्ट्रात - इंदौर, बडोदा, बेळगाव वगैरे - तरी व्हावे असे वाटते.)