उगवत्या किंवा होतकरू साहित्यिकांच्या पुस्तकप्रकाशनाच्या कंडशमनावर किती मराठी प्रकाशकांचे संसार चालतात, हा अभ्यासाचा विषय आहे.

पुस्तकप्रकाशन हा सर्वस्वी स्थनिक, उगवत्या साहित्यिकांचाच कंड असावा, हा एकांगी विचार वाटतो. वस्तुतः, पुसकाच्या माध्यमातून प्रकाशित होऊन जितके सर्वदूर पोहोचेल, नावारुपास येईल, त्यापेक्षा आंतरजलासारख्या प्रकाशनाच्या मर्यादा नसलेल्या माध्यमातून असे साहित्य प्रसिद्ध व लोकप्रिय होत आहे.भारताबहेर जन्म घेणारे सगळेच मराठी साहित्य प्रकाशनयोग्य नसले तरी प्रकाशनासाठी त्याचा विचारही होऊ नये इतके टाकाऊही नाही.भारताबाहेरील स्थानिक उगवत्या साहित्यिकांकडूनही चांगल्या दर्जाचे साहित्य निर्माण होत आहे, याबाबत दुमत नसावे. भारताबाहेरील मराठीजनांच्या साहित्याला स्वतः साहित्यिकांनी, समकालीनांनी, जालनिशा आणि इतर प्रसारमाध्यमांनी आणि आणखीही काहीजणांनी कळत-नकळत जी फेस आणि/किंवा मार्केट वॅल्यू चिकटवली आहे, तिचा विचार करता प्रकाशकांना असा कंड असणेही वावगे आणि/किंवा आश्चर्याचे ठरू नये. अमेरिकेत राहणाऱ्यांनी काही कथा, अनुभव इ. लिहिले की ते वाचण्याबाबत तसेच एकूणच अमेरिकेतील जीवनाबाबत, जीवनशैलीबाबत, सुखसुविधा(तसेच डॉलरमस्ती)बाबत,मऱ्हाटमोळ्या लेखणीतून झरणाऱ्या साहित्याबद्दल भारतातही हल्ली उत्सुकता आहेच, हे नाकारता येईल काय?अमेरिका हे एक उदाहरण.आखाती देश, युरोप, सिंगापूर इ. च्या बाबतीतही हे लागू होईल. मग तसे असल्यास प्रकाशकांनी आपल्या पोळ्या शेकायचा प्रयत्न केल्यास नवल ते काय?कोणा प्रकाशकांचे संसार चालण्याइतपत उत्पन्न यातून मिळत नसेलही; पण अनुभवी प्रकाशकांसाठी तसेच प्रकाशनक्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी(ही) हा कमाईचा अगदीच वाईट किंवा अंगवर शेकेलसा पर्यायही नाही. हे लक्षात घेतल्यास नेटवर्किंगच मुद्दा (प्रकाशकांनाही) नजरेआड करता यायचा नाही,असे वाटते.