परदेशात अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतल्याने जिथे मराठी लिहिली, बोलली जाते त्या महाराष्ट्रातील वाचकसंस्कृती वाढीस लागणार आहे काय? मुळीच नाही.
आम साहित्यरसिक, साहित्यप्रेमींची उपस्थिती शक्य होईल अशा ठिकाणी अ. भा. साहित्य संमेलन घेणे अधिक योग्य आहे काय? अर्थातच.
अमेरिकेत इतर सर्व खंडांचे प्रतिनिधित्त्व करणारे दुसरे अनिवासी मराठी साहित्य संमेलन घडवून आणावे. मराठी प्रेमींच्या मदतीने गरज भासल्यास महाराष्ट्रातील नामवंत/ उगवत्या साहित्यिकांना परदेशवारी घडवावी. प्रकाशकांना आमंत्रणे द्यावी. काव्यलेखन, ललित लेखन इत्यादींसाठी विविध उपक्रम राबवावेत. त्याकरता जरुर महाराष्ट्रातील नामवंतांना बोलवावे. महाराष्ट्रातल्या संमेलनात जाऊन आपले कौतुक करण्याकरता स्टॉल उभारण्यापेक्षा हे अधिक सकारात्मक पाऊल ठरेल. मराठीसाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांकरता निधी गोळा करावा आणि त्यांना याकारणे मदत करावी.
वि. सू. -माझ्या या लेखनात कोणताही उपहास नाही.
महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व मराठी साहित्य महामंडळाची गरज उरलेली नाही, असे तुम्हाला वाटते काय?
येऊ लागलेले राजकारणी स्वरूप, त्यानिमित्त होणारी साहित्यिकांची अधिकाधिक चिखलफेक वाचून कशाकरता संमेलन? असे वाटते, पुस्तकाची विक्री स्टॉलवर होते हे व असेच काही सामान्य माणसाच्या फायद्याची एक दोन कारणे वगळता हे संमेलन कशाकरता असा प्रश्न पडतो.
सॅनफ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन घेतल्याने मराठी साहित्य समृद्ध होण्यास मदत होईल असे तुम्हाला वाटते काय?
मुळीच नाही.हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सॅनफ्रांसिस्कोत होऊ नये म्हणून विरोध करणे योग्य आहे काय?
सरकारी निधी वापरून जर या उपक्रमाला हातभार लावणार असतील तर विरोध व्हावाच. शिवाय