निनिवाम्हणजएक प्रयोग म्हणून बघितल्यावर मला हा प्रश्न पडतो, की का नाही?

१) परदेशात अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतल्याने जिथे मराठी लिहिली, बोलली जाते त्या महाराष्ट्रातील वाचकसंस्कृती वाढीस लागणार  आहे काय?

आधीच (घरबसल्या) कसं कळेल? आपण संकुचित विचार का करावा? एकदा दोनदा प्रयत्न होण्याआधीच आपण कल्पना निकालात का काधावी?

आणि मग आपलीच तक्रार. मराठी माणूस कोषातून बाहेरच पडत नाही.

२) आम साहित्यरसिक, साहित्यप्रेमींची उपस्थिती शक्य होईल अशा ठिकाणी अ. भा. साहित्य संमेलन घेणे अधिक योग्य आहे काय?

होय, पण  'आम साहित्यरसिक, साहित्यप्रेमींची उपस्थिती शक्य होईल अशा ठिकाणी "" '  व्हावी असे वाटत नाही.

मी मुंबईत राहतो. मला काम सोडून रत्नागिरीतही साहित्य संमेलनाला जाता येणे शक्य नाही. मग अमेरीकेशी वैर का?

३) महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व मराठी साहित्य महामंडळाची गरज उरलेली नाही, असे तुम्हाला वाटते काय?

नाही. पण आपण काही गोष्टी आवडीतून करतो. साहित्य देखील केवळ गरजेतून निर्माण होत नाही.

४)सॅनफ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन घेतल्याने मराठी साहित्य समृद्ध होण्यास मदत होईल असे तुम्हाला वाटते काय?

इथे मला एक नवीन प्रश्न पडतो.

साहित्याची समृद्धी म्हणजे काय? 

समृद्ध साहित्याची निर्मिती? की

समृद्ध साहित्याचा प्रसार?

        प्रसार होण्यास मदत होऊ शकते असं वाटतं.

                 आणि प्रसारातूनच निर्मितीत विविधता येते.

जेंव्हा जेंव्हा मराठी साहित्याच्या वाटा समाजातील विविध स्तरांना खुल्या झाल्या आहेत, तेंव्हा तेंव्हा मराठी साहित्यात भरच पडत गेली आहे.

जर मराठी साहित्यिकांनी प्रयत्न केले नसते तर मोहोम्म्द रफी यांचा आवाज आणि शंकर महादेवन यांच संगीत यांपासून आपली भाषा वंचित राहिली असती.

फडकूदे की मराठी झेंडा सातासमुद्रापार.

५) हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सॅनफ्रांसिस्कोत होऊ नये म्हणून विरोध करणे योग्य आहे काय?

नाही.

सर्वात जास्त चर्चा खर्चावरून झाली आहे..................

"ज्या संस्थेने निमंत्रण पाठवले आहे ती "बे एरिया महाराष्ट्र मंडळ' ही संस्था तेथे गेली २५ वर्षे मराठी मंडळींसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी मोठा आर्थिक भार उचलून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे".

        असे लेखात लिहिले आहे. तुमच्या आणि माझ्या जीवावर खर्चाचा बोझा नाही. तरी त्यावर विरोध का?

                 म्हणजे "माझा" खर्च कोणीही उचलणार नाही, हा केवीलवाणा द्वेषच आहे का फक्त?

आणि कृपया सगळ्या गोष्टींचा शेतकरी आत्महत्येशी संदर्भ जोडू नये असे वाटतं.

त्यावर वेगळी चर्चा करता येईल.

"अनिवासी मराठी साहित्य संमेलन" .... आपण मराठीबद्दल बोलत आहोत ना? मग ते निवासी आणि अनिवासी भारतीय  असं विभागलं का जावं?

कधीतरी त्याचं केवळ "मराठी साहित्य संमेलन" असं नाव होईल अशी अपेक्षा (आशा नाही  :)) ठेऊया ना.

"आऊटसाईड ग्लॅमर" मुळे होणारा फायदा...... हा विचार देखील छानच आहे की.

       माझ्या प्रतिसादात मी वरील काही जणांच्या मतांचे समर्थन केलं आहे आणि बहुतेकांच्या मताला विरोध.

             वाईट वाटून घेऊ नका, ह्यातून हेच स्पष्ट होते, की मी सगळे प्रतिसाद वाचले आहेत. :)

           प्रथम