सर्वात जास्त चर्चा खर्चावरून झाली आहे..................
"ज्या संस्थेने निमंत्रण पाठवले आहे ती "बे एरिया महाराष्ट्र मंडळ' ही संस्था तेथे गेली २५ वर्षे मराठी मंडळींसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी मोठा आर्थिक भार उचलून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे".
असे लेखात लिहिले आहे. तुमच्या आणि माझ्या जीवावर खर्चाचा बोझा नाही. तरी त्यावर विरोध का? म्हणजे "माझा" खर्च कोणीही उचलणार नाही, हा केवीलवाणा द्वेषच आहे का फक्त?
मी स्वतः सॅनफ्रान्सिस्को बे एरियात राहतो.महाराष्ट्र राज्य शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे र. २५ लाखांचे अनुदान भारतात राहून, व्यवसाय करून कर भरणाऱ्यांच्या खिशातून येत असल्याने संमेलन सामान्य (भारतस्थित महाराष्ट्रीय) नागरिकास उपस्थिती नोंदता येईल अशाच ठिकाणी व्हावे, असा हट्ट धरला तर त्यात काहीच गैर नाही, हे मी बे एरियात राहूनही सांगू शकतो. यात द्वेष कसला आलाय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ कोणाही सोम्यागोम्याचा खर्च उचलणार नाही, ते तितकेही श्रीमंत नक्कीच नाही. माझ्या माहितीनुसार मंडळाचे पदाधिकारी, विद्यमान व माजी अध्यक्ष आणि मंडळाच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर(ते कोण हे मला अद्याप माहीत नाही) यांचाच खर्च (विज़ा,तिकिटे,वास्तव्य,भोजन इ. ) बे एरिया मंडळ उचलणार आहे. असे असताना जर तुम्ही* दर वर्षी नियमितपणे संमेलनास उपस्थित राहत असलात, तर या वर्षी साहित्य परिषदेने तुमच्यासारख्यांवर अन्याय केलाय, असा ग्रह होऊन ह विरोध होत असेल, तर ते स्वाभाविकच नव्हे काय?यात मला तरी कोणताही द्वेषभाव वगैरे दिसत नाही, हे न्याचरलच आहे.
* तुम्ही = 'प्रथम येथे' हा सदस्य नव्हे, तर सामान्य रसिक; संमेलनास दरवर्षी न चुकता हजेरी लावणारे रसिक. हा आकडा नगण्य नक्कीच नसावा.