मराठी साहित्य मरायला टेकल आहे, पुस्तक कोणी विकत घेत नाहीत वगैरे गोष्टी कायमच चर्चेत असतात. त्यावेळेला कोण साहित्य सम्मेलन भरवल्याने या प्रश्नाना उत्तर मिळते असे बोलत नाही. आता इकडे राहिलेल्या आम्ही लोकानी जर वर्गणी काढून जर सम्मेलन भरवायला बघितल तर मात्र लगेच सगळेजण तुटून पडत आहेत. इंदूर, बडोदा, बेळगाव, कारवार इथे सम्मेलन भरवलेल चालते. अख्ख्या महाराष्ट्रातून तिथे जायला सगळ्यानाच सोयिचे पडते का?
तिकडची किती सम्मेलने उधळली गेली आहेत. भांडणे झाली आहेत. समांतर सम्मेलने भरवली गेली आहेत. आता एकदा इकडे सम्मेलन भरवून पाहायला काय हरकत आहे?
इकडे बोलावलेल्या लोकांमध्ये बरेच फुकट यायला मिळाल म्हणून येणारे लोक आहेत हे माहीत आहे. पण पुण्यात वाढलेल्या माज्यासारखीला असे लोक सर्वत्रच आहेत हे माहीत आहे.
आणि आम्ही लोक इथे पंचवीस वर्षे सन्स्था चालवतो आहोत याबद्दल एक तरी कौतुकाचा शब्द आला असता तर बरे वाटले असते.