तुमच्या मंडळाबद्दल कुणी काही बोललंही नाहीये. तर उगाच आगपाखड का करता?
दरवर्षी प्रेमाने आणि नेमाने परवडत नसतानाही खिशाला फोडणी देउन, प्रसंगी बिनपगारी रजा घेऊन संमेलनाला हजेरी लावणारे आस्वादकांचे गट मी पाह्यले आहेत. नवोदितांचेही असे गट माहित आहेत. या सगळ्यांना या साहित्य संमेलनापासून दूर ठेवून असं काय मोठं साधलं जातंय हा मुद्दा आहे.
खरंतर मूठभर पदाधिकाऱ्यांना फुकटात अमेरिकावारी हेच साध्य होताना दिसतंय बाकी मायमराठीचं, साहित्याचं वा साहित्यिकांचं भलं होताना दिसत नाही यात.
बर इंदूर वा बेळगाव या ठिकाणी पुणे, मुंबई वा अगदी गडचिरोली या ठिकाणाहून जाण्याचा खर्च आणि या ठिकाणी राहण्या जेवण्याचा खर्च तसेच जाण्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता या बद्दल आपल्याला माहिती आहे का? कारण खर्च असतो पण कंबर वाकवणारा नाही. भारताची आगगाडी खूप कमी पैशात प्रवास घडवते आपल्याला. आणि गडचिरोली हून बेळगावात जायला माणसाला पासपोर्ट वा व्हिसा ची जरूर पडत नाही. तेव्हा इतर राज्यांतील मराठी भागातल्या शहरात संमेलन घेणे आणि अमेरिकेत यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
तुमच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्षमतेचा इथे काही संबंध नाही.