तुम्ही पंचवीस वर्षांपासून संस्था चालवताहात ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनासाठी आपले मंडळ वर्गणी काढते आहे, हे तर उत्तमच! पण ही चर्चा महाराष्ट्र मंडळाविषयी नाही.

१. बे एरियाची बेळगाव, इंदूर, बडोदा ह्या गावांशी, शहरांशी तुलना होत नाही. केल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. कारण बेळगाव, इंदूर, बडोदा शहरांत मराठी बोलणाऱ्यांची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. तसेच ह्या गावांना सकस साहित्यनिर्मितीची परंपराही आहे, असे वाटते.
२. साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या साहित्य महामंडळाला महाराष्ट्र सरकार अनुदान देते. महाराष्ट्रात राहणाऱ्या करदात्यांचा पैशातूनच हे अनुदान येते. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्रात/भारतात न होणाऱ्या, ह्या संमेलनाला (बे-एरिया ममं ह्या संस्थेला व्हे!) विरोध करण्याचा अधिकार नाही काय?
३.  विविध साहित्य/साहित्यिक संमेलनांचे/जत्रांचे/उरुसांचे औचित्य काय, त्या संमेलनांत काय होते, हा देखील अत्यंत वेगळा विषय आहे.असो.

अवांतर : पंचवीस वर्ष जुन्या बे एरिया महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेचे संकेतस्थळ ह्या संमेलनाच्या निमित्ताने का होईना मराठी भाषेतूनही निघेल, असे वाटते. शुभेच्छा!