१. इंदौर-बडोदे-बेळगाव या गावात लक्षणीय म्हणजे नेमके किती लोक मराठी आहेत ? किती संख्या असता ती लक्षणीय ठरते ? ज्या गावांना साहित्यनिर्मितीची परंपरा नाही तिकडे साहित्यसंमेलन होऊ नये असा काय नियम आहे ?
२. पैशाचा मुद्दा मान्य. महाराष्ट्राच्या करदात्यांकडून एकही पैसा न घेता हे संमेलन झाले तरच ते होणे योग्य. एरवी हे संमेलन म्हणजे सार्वजनिक पैशातून केलेली चंगळ ठरते.
इंदौर, ग्वाल्हेर, बडोदे, वगैरे ठिकाणी संमेलने होतात. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात. असे असल्यास मग परदेशालाच विरोध का? शेवटी, SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा आहे हे नजरेआड करून कसे चालेल? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमध्ये या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की. " कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी प्रकाशने, महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्या संस्था, बीएमेम सारखी संमेलने, परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे या सार्या गोष्टी, परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे याचे द्योतक आहेत.
विरोध आयते खाण्याला असावा. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाबद्दल असावा. परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.