ची गोष्ट वेगळी आहे. अनेक दशकांपूर्वी (शतक?) तिथे स्थलांतरित झालेले लोक अजून मराठी भाषा आपुलकीने वापरतात, हे कौस्तुकास्पद आहे. मी स्वतः आमच्या येथे अशा एका व्यक्तिला भेटलेलो आहे. श्री. सुधीर मुळ्ळू हे एयर मॉरिशसचे अधिकारी अगदी आमच्या मराठी मंडळाचे सभासदही झाले होते.
"परदेशस्थ मराठी लोकांमध्ये या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की." ह्यासंदर्भात मी लिहीलेला श्री. कोठावळेंचा अनुभव फारसा आशादायक नाही. प्रियाली व सुवर्णमयी ह्यांनीही जे लिहीले आहे, त्यावरून असे काही तुम्ही म्हणता तसे घडेल असे दिसत नाही. अर्थात एकदम नव्या उत्साहाने साहित्य संमेलन आपल्या दाराशी आले म्हणून तेथील मराठी प्रजेत नवा उत्साह संचारला, आणि ते निगुतीने मराठी साहित्याची आवड जोपासू लागले तर गोष्ट वेगळी.