इंदौर-बडोदे-बेळगाव या गावात लक्षणीय म्हणजे नेमके किती लोक मराठी आहेत ? किती संख्या असता ती लक्षणीय ठरते ?
हे कुणालाही कुणा दुसऱ्या मराठी माणसाला सांगावे लागू नये.
ज्या गावांना साहित्यनिर्मितीची
परंपरा नाही तिकडे साहित्यसंमेलन होऊ नये असा काय नियम आहे ?
असे मी मुळीच म्हटलेले नाही. बे एरियात होऊ घातलेले संमेलन नियमानुसारच होते आहे. ह्या नियमानुसार (जिथे मराठी माणूस तिथे संमेलन) परवा लास वेगासला एखाद्या कॅसिनोतही होऊ शकेल किंवा नेरवा अगदी टिंबक्टूलाही. मुद्दा ह्या संमेलनावर अधिक आणि आधी हक्क कुणाचा हा आहे! हा हक्क परदेशस्थांचा नक्कीच नाही, असे माझे मत आहे. मराठी भाषकांची संख्या, उपस्थित राहू शकणाऱ्या रसिकांची वाचकांची संख्या, उगवत्या साहित्यिकांची संख्या आदी गोष्टींचा (ह्यात साहित्यनिर्मितीची परंपरा, वाचनसंस्कृती वगैरे वगैरे गोष्टीही आली.) विचार करायला हवा.
इंदौर, ग्वाल्हेर, बडोदे, वगैरे ठिकाणी संमेलने होतात.
मी म्हणतो पुन्हा पुन्हा व्हावीत. माझ्या माहितीतले एक अत्यंत रसिक आणि व्यासंगी प्राथमिक शिक्षक आणि त्यांच्या पत्नी केवळ साहित्य संमेलनाला जाता यावे, म्हणून वर्षभर तयारी करत असतात. (म्हणजे पैशाची जुळवाजुळव, काटकसर, पुस्तकांच्या याद्या वगैरे) ह्या आणि अशा आम लोकांचा आधी विचार करायला हवा.
शेवटी, SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा
आहे हे नजरेआड करून कसे चालेल? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन
भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमध्ये या निमित्ताने काही
सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने
थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की.परदेशस्थ मराठी लोकांमध्ये या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल,
परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही
तरी चांगले हाती लागेलच की.
पण त्यासाठी 'अखिल भारतीय' मराठी सासंच आयोजित करायला हवे का?
मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात.
'जागतिक' मराठी परिषद 'एसएफओ'ला झाल्यास हरकत नाही. उत्तम!!! मग कोणी का आशीर्वाद देईनात.
" कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन
निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी
प्रकाशने, महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्या
संस्था, बीएमेम सारखी संमेलने, परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे
या सार्या गोष्टी, परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे
याचे द्योतक आहेत.
हे सारे अत्यंत कौतुस्कापदच आहे! परेशस्थ मराठी माणसाशी कुणाचीही खुन्नस असायचे काही कारण नाही. माझी तरी खुन्नस नाही .("We
organize annual Maharashtrian Festivals like Makar Sankrant,
Ganeshotsav, Diwali. These festivals give the community a
chance to renew the cultural ties and encourage children to
learn about the culture.." यासारखी वाक्ये एखाद्या महाराष्ट्र मंडळाच्या संस्थळावर वाचल्यावर फारफार तर हसू येईल. आणि असे ममं मराठी सासं आयोजित करते आहे हे वाचल्यावर तर अधिकच. पण खुन्नस मुळीच येणार नाही. संबंधितांनी हलकेच घ्यावे हे सांगणे न लगे.)
थोडक्यात, परदेशी आणि देशी मराठी भाषक असा भेद करणे तसे चुकीचेच. इथे भूक, गरज, ऐपत आणि संख्या ह्या गोष्टी बघायला हव्यात. आणि संमेलनाला विरोध म्हणजे परदेशस्थ मराठी भाषकांना विरोध नाहीच.