तुमचा किंवा कुणाचा विरोध सर्व परदेशस्थ जमातीला आहे असे मला कधी वाटलेच नाही हे मी आवर्जून सांगतो. भाषेच्या एका धाग्यानेच बांधली गेलेली आपण सर्व मंडळी आहोत हीच भावना माझ्या ठायी आहे. तेव्हा तसे गैरसमज नाहीतच.
एनाराय संप्रदायाची संख्या, त्यांची अभिरुची, भाषेबद्दल, साहित्याबद्दलची त्यांची समज या गोष्टी भारतात राहणाऱ्या मराठी भाषकांपेक्षा कमीच हेदेखील मान्य. पण तुम्हाला काही शतकांपूर्वी स्थलांतरित झालेल्या आपल्या बांधवांकडे संमेलन भरलेले चालते; पुन्हा पुन्हा भरावेसे वाटते. मग काही दशकांपूर्वी गेलेल्या , आणि तितकीच तळमळ असलेल्या भाषकांबद्दल हा विरोध का ? अंतराच्या प्रमाणात हे भाषाप्रेम थोडेच बदलते ? की अमेरिकास्थित लोकांनी संमेलन भरवण्याकरता २२व्या शतकापर्यंत थांबावे ?
पैशाचा मुद्दा सर्वथा मान्य हे आधीच नोंदवलेले आहे. येथील लोक महाराष्ट्रात/भारतात कर भरत नाहीत. महाराष्ट्र सरकारच्या- पर्यायाने लोकांच्या - पैशावर त्यांचा काहीएक हक्क नाही. पण ८० वर्षांतून एखादे वेळी या लोकानी संमेलन भरवण्यास हरकत नाही.