इथे थोडेसे अवांतर पण पुस्तकांशी संबंधीत -
अनेक वर्षांपूर्वी भारत सोडलेल्या मंडळींच्या मनात भारताविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यांना मराठी साहित्य वाचायचे झाले तरी ते पठडीतील लागते हा माझा स्वानुभव आहे. नवे कलाकार, संदीप खरेसारखे कवी यांच्याशी या व्यक्ती संबंधीत राहतात कारण दृकश्राव्य माध्यम. त्यामानाने साहित्याशी संबंधीत राहणारे अत्यल्प आहेत. नव्या साहित्याशी बांधिलकी ठेवणारे मी आमच्या गावीतरी कोणीही पाहिलेले नाहीत. (याचा अर्थ मोठ्या शहरांत नसावेत असे नाही परंतु प्रमाण फार मोठे असावे असे वाटत नाही) यावरून पुस्तक प्रकाशकांना किती वाव आहे याची कल्पना यावी.