प्रतिसादाची वाट पाहतोय. (कोणी किती रवंथ करावे ह्याबाबत आपली संस्कृती (बहुतेक) काहीही सांगत नाही.)
अजून एक :- माणसाने नुसतेच चावून चावून रवंथ करणे पुरत नाही तर त्याने सदैव चरत असावे असं आपली संस्कृती सांगते. संस्कृतात ते सुभाषित नाहीये का? 'चरन् वै मधु विन्दति।' म्हणजे चरणाऱ्याला मध मिळतो. (म्हणूनच का हो आपला 'चरिता'र्थ चालवायला अनेक जण 'चरत' असतात? खरंतर जो चारा घोटाळा झाला होता तो आपल्या संस्कृतीला धरूनच होता असे आमचे म्हणणे आहे.)