नमस्कार,
यापूर्वीही अनेक वेळा मनोगत वर चर्चांना सुरुवात झाली व नंतर त्या भरकटत गेल्या आहेत. तशी वेळ येऊ न देणे आपल्या सगळ्यांच्याच हातात असते. (पण वाहवत जायला होते, हेही खरेच आहे.) कधी कधी चर्चाप्रस्ताव मांडऱ्याने नेमकेपणाने व चित्त यांनी सुचवल्याप्रमाणे सोदाहरण मांडणी केली तर दुसऱ्याला समजायला सोपी जाते. चर्चा प्रस्ताव करणाऱ्याने खचितच त्या विषयावर बरेच मनन व चिंतन केलेले असते, परंतु आपल्या मनातील दहा वाक्यांपैकी चारच सांगितली तर वाचणाऱ्यांना त्याचा अर्थ उमगेपर्यंत अनेक फाटे फुटलेले असतात.
दुसरे म्हणजे चर्चेत सहभागी होताना मी म्हणतो तेच बरोबर, तुमचे चूक(च) आहे हा दृष्टीकोन चर्चा पुढे नेऊ शकत नाही. (हे प्रस्ताव मांडऱ्यांना तसेच भाग घेणाऱ्यांना लागू होते.) शेवटी हेही लक्षात ठेवले पाहिजे की चूक किंवा बरोबर हे तसेच त्याची तीव्रता सापेक्ष असते. तसेच उपहास हा सतत येत राहिला तर तो हासरा न राहता बोचरा होऊ शकतो.
मला वाटते की नवीन विचारांचे स्वागत व्हावे, पण त्यातील जे न पटणारे मुद्दे असतील तेही नेमकेपणाने (सोदाहरण) मांडले जावेत.
- पराग.