यात हिरव्या मिरच्या घालत नाहीत. त्याचा रंग येतो. लाल सुक्या मिरच्यांचे बी, किंवा हिरव्या मिरच्यांचे पण बी घालतात. मिरचीचा तिखटपणा हा बी मध्येच असतो. यात लसूणही सहसा घालत नाहीत. फोडणीत खडा गरम मसाला(लवंग, दालचिनी, मिरे), वेलची पण टाकतात. वाटणात काजू घालतात रश्श्याला थोडा दाटपणा येण्यासाठी. तसा हा रस्सा फार दाट नसतो.