हे फारच आदर्शवादी उत्तर झालं.
निरपेक्ष मैत्री करावी, हे मलाही कळतं, पण सहजासहजी वळत नाही ना!
एखाद्या व्यक्तीशी आपल्याला मैत्री करायचेय, म्हणून त्याला दोन-चारदा फोन करणं, एसेमेस करणं समजू शकतं. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही, किंवा मैत्रीला नकार आला नाही, तर काय करायचं? आपण त्याच्या गळ्यात तर पडू शकत नाही ना? तो शिव्या नाही का देणार?
मग अशा वेळी काय करायचंय? प्लेटॉनिक फ्रेंडशिप???
समजा, मला वाटलं, तुमच्याशी मैत्री करावी. पण तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाहीत, तर काय करायचं?
आपल्याला आवडत्या व्यक्तीशी मैत्री करता येत नाही. किंवा चांगला मित्रही काही वेळा कारण नसताना दूर जातो. कधी महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापासून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी लपवतो. माझी व्यथा त्याबद्दल आहे.
समजा, अगदी जवळच्या, नेहमीच्या संपर्कातल्या मित्राचं लग्न ठरलं, किंवा तो परदेशी वगैरे जाणारेय, हे आपल्याला दुसऱ्याकडून किंवा अगदी आदल्या दिवशे कळलं तर? `अरे लब्बाडा, अशी गम्मत आहे काय?' असं म्हणून त्याचा गालगुच्चा घ्यायचा?
निरपेक्ष ही संकल्पना खूप सापेक्ष आहे.
असो. पटलं तर घ्या.