सोनल,

गम्मत  आहे , इथेही 'पुरावा' मागणारे आहेतच!

मला कधी कधी या पुरावा मागणारांची कीव येते, त्यांना प्रत्येक गोष्ट लॉजिकली लागते.

(अगदी झोंबणारे उदाहरण द्यायचे झाल्यास, आई ही वस्तुस्थिती असते तर बाप हा विश्वास! तिथे पुरावा शोधत नाहीत.तशी पद्धत नाही, ज्याला हौस आहे त्याने खुशाल DNA तपासण्या कराव्यात.)

प्राचीन भारतीय संस्कृती, रीती-रिवाज , भाषा - परंपरा, जीवन पद्धत हे सगळं वाईट्ट, आणि जे काही तिकडून आले ते ते सर्व चांगले असे म्हणण्याची सध्या फॅशनच आहे, आणि असे वागणे- बोलणे हे 'पोलिटिकली करेक्ट' असते.

त्यामुळे तुमचा विषय कितीही चांगला असला तरीही लोक भाषा कशी परत आणता येईल , याचा विचार करणार नाहीत, पुरावे मागतील!

माझ्या मते जसे इंग्रजी हे बालवाडी, पहिली..... तसेच सर्व विद्या शाखेत वापरले जाते तसेच संस्कृत भाषेचा वापर व्हावा 

या तुमच्या मताशी मी सहमत आहे, कुठेतरी सुरुवात करायला हवी. प्रत्येक भारतीय भाषेला संस्कृत जवळची भाषा आहे. ती राष्ट्रभाषा म्हणून सार्वत्रिक मान्य होऊ शकेल, त्याने राष्ट्रीय एकात्मतेला हातभारच लागेल.कदाचित भाषिक वाद कमी होतील. संस्कृत- गीर्वाण वाणी ही आसेतुहिमाचल पसरलेल्या भारतीयांचे सांस्कृतिक प्रतिक आहे.

पण लक्षात कोण घेतो??? हज यात्रेला सवलत देणाऱ्या माय-बाप ( आपले ते कार्टे आणि दुसऱ्याच्या बाब्याचे लाड करणारे माय-बाप!) सरकारला त्यात धार्मिक तेढ दिसेल, त्यामुळे जोपर्यत अमेरिका- युरोप मधून संस्कृत पंडित येत नाहीत तोपर्यंत आपण संस्कृत वाचावी म्हणून काहीही करणार नाही........!

शिकण्यासाठी-

शक्यतेवढा प्रयत्न करावा, ज्याला मराठी चांगली येते त्याला संस्कृत यायला काहीच प्रत्यवाय नसवा, प्रयत्न केल्यास बऱ्यापैकी यश येते हा स्वानुभव आहे,

 संस्कृत शिकवणारी संस्था - " अक्षरम"  दुवा क्र. १

- विटेकर