सुरेख कथा. 'निळ्या काचेच्या पेना'शी हिची तुलना अनिवार्य आहे पण ही कथा निश्चितच वेगळी आहे. यातला कौस्तुभ हा जरासा मोठा झालेला निखिल वाटतो.
ही कथा कोकणात न घडता खानदेशात घडते त्याप्रमाणे बोलीभाषेसकट दैनंदिन आयुष्यातले बारकावे मस्त टिपले आहेत. लहान मुलाचे भावविश्व चितारण्याची हातोटी विलक्षण आहे. समीरदादा आणि ज्योत्स्नाताई यांची उलगडत जाणारी भावकथा लहान मुलाच्या दृष्टीतून सुरेख दाखवली आहे. "दोघेही फुलदाणीतल्या फुलांसारखे शेजारी शेजारी पण गप्प गप्प बसले", "माझे राज्य असते तर तिला राणीची मोलकरीण करून भांडी घासायला बसवले असते." इत्यादी वाक्यांनी कथेची रंगत वाढली आहे. या मालिकेतल्या आणखीही कथा वाचायला आवडतील.