खूपच सुंदर, मिलिंदराव... मानलं!
"..कळस गाठण्याआधीच घर जरा खचत गेले.."
वाहवा! मंदिराची उपमा किती सुंदर रितीने दिलीत राव.. मानलं!!
काय घडले, कोण चुकले?
पडत मात्र गेली शकले
मौनाचे वास्तव्य ओठांवरती वाढत गेले
अन पाणी हळूहळू डोळ्यांमध्ये भरत गेले
.... काहीतरी चुकत गेले
अगदी खरं. सगळं समजत असतांनासुद्धा माणूस हतबल झाल्यासारखा होतो, सावरू शकत नाही, स्वतःलाही अन् घरालाही. फार साध्या शब्दांत खूप मोठी गोष्ट सांगितलीत. सलाम!