पहिल्या व शेवटच्या कडव्याची सुरुवात 'दिवस होते 'ने न करण्यामागे काही विशेष हेतु नसल्यास पहिल्या कडव्याची सुरुवात 'दिवस होते प्रश्नांचे' अशी केली तर?
जयंतराव,
अभिप्रायाबद्दल मनः पूर्वक आभार. हेतू काहीच नव्हता. ही कविता स्वतःचा आकृतीबंध स्वतःच घेऊन आली. जशी सुचली तशी लिहीत गेलो. मुक्तछंदात लिहिल्यामुळे आकृतीबंधाविषयी फार काटेकोर विचार केला नाही हेही खरे आहे. 'दिवस होते प्रश्नांचे' ने पहिल्या कडव्याची सुरुवात करण्याच्या तुमच्या सुचनेचा विचार केल्यावर मला असे वाटते की पहिले व शेवटचे कडवे हे दोन्ही एकूणात सिंहावलोकनाचे, जे घडले, घडत गेले ते का यावर मागे वळून बघण्याचे आहेत. 'ते' दिवस प्रश्नांचे नव्हते, ते आनंदाचे, उपभोगाचे, सहजीवनाचे, दोन आयुष्य गुंफण्याचे होते - निदान असायला हवे होते. त्यामुळे 'दिवस होते प्रश्नांचे' हे कितपत योग्य होईल ही शंका आहे. उलट, आताचे दिवस हे प्रश्नांचे आहेत. तुम्हाला काय वाटतं ?