याचा संबंध देशप्रेमाशी कमी आणि सार्वजनिक स्वच्छतेशी जास्त वाटतो आहे. आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे जेव्हा सार्वजनिक स्वच्छता आणि सिव्हिक सेन्स आपल्याकडे येईल तो आपला सुवर्णकाल. परदेशातही अनेक लोक स्वातंत्र्यदिनाचा दिवस सुट्टी म्हणून घेतात. सगळे मानसिकतेवर अवलंबून आहे. कुठलीही गोष्ट त्याच इंटेंसिटीने वर्षानुवर्षे करणे अवघड असते.
आजच्या पिढीने (माझ्यासकट) पारतंत्र्य म्हणजे काय हे पाहिलेले नाही. त्यांच्या मनात देशप्रेमाविषयी तीच भावना येईल अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे?
याचा अर्थ हा प्रतिसाद देशविरोधी आहे असा लावू नये. पण स्वातंत्र्यदिन साजरा करतना आपण नेमके काय करतो? आणि जे काही करतो त्यामुळे समाजाला कितपत फायदा होतो?
हॅम्लेट