धन्यवाद.. बऱ्याच दिवसांनी त्यांच्या बद्दल वाचायला मिळाले.
त्यांच्या बद्दल अजून काही वाचलेले आठवते.. सुरुवातीला त्यांचा सेवादलाशी संबंध आला आणि त्यानी त्यात बरेच दिवस कामही केले. नंतर मात्र शिवसेनेशी जवळीक झाली आणि त्यांनी सेनेचा प्रचारही केला. 'विच्छा' मधल्या त्यांच्या हजरजबाबी आणि राजकिय कोट्यांनी त्यांना नाव मिळवून दिले. वर उल्लेख केल्या प्रमाणे बरेच दिवस चित्रपटातुनही हे अधिराज्य चालू राहिले. त्यांनी अनेक चांगली गाणी दिली पण शासकिय माध्यमांनी त्यांच्यावर मात्र अघोषित बंदीच घातली होती. पण अजुनही त्यांची गाणी/चित्रपट वाहीन्यांवर न दिसण्याचे कारण मात्र समजू शकत नाही. (भालजींच्या स्टुडिओवरून त्यांचे लता मंगेशकरांबरोबरही बिनसले होते.) दुर्देवाने पुढे विनोद हा जास्त बिभत्सपणा कडे झुकू लागला. गमतीची गोष्ट अशी वाटते की त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटातील विनोदांनाही अनेकांनी नाके मुरडली आणि त्यांची पुढची पिढी हिंदी/ईंग्लीश चित्रपटातील तसे विनोद चवीने बघत आहे.