लेख वाचला. आपले सर्व विचार सुसूत्र आहेत. मात्र इच्छामरण मागून मिळते हा विचार चुकीचा आहे. प्रत्येक सजीव मुळातच इच्छामरणी असतो. त्याची जीवनाशा कधी संपवायची याबाबत त्याला उपजतच समज असते. म्हणूनच प्रायोपवेशन आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
मात्र, हल्लीच्या आपल्या जीवनात आयुष्यभर इतरांवर अवलंबून आपल्या वैयक्तिक गरजा भागवत राहण्याचे विचित्र संस्कार आपल्यावर सतत घडत राहिल्यामुळे आपण आपला इच्छामरणी असण्याचा अधिकार स्वहस्ते विसर्जित करत असतो.
याकरता आपण आपापल्या वैयक्तिक गरजा स्वतःच्या स्वतः भागवण्याची सवय बाणवून घ्यायला हवी. विशेषतः अवकाशप्राप्तीनंतर. ८०-९० च्या पुढील विकलांग अवस्थेतही इतरांकरता उपयोगी कामे करता येण्याच्या आपल्या शक्तींचा सतत शोध घेत रहायला हवा. ज्या वेळी आपल्या वैयक्तिक गरजा पुऱ्या करणे शक्य राहणार नाही आणि इतरांकरता आपण कुठल्याच प्रकारे उपयुक्त राहणार नाही त्यावेळी आपल्या अन्नपाणीग्रहणास निग्रहाने नकार देऊन इच्छामरण प्राप्त करून घ्यायला हवे. त्याकरताही आपण इतरांवर अवलंबून राहण्याची स्वप्ने पाहणे हेच अवनतीचे पहिले लक्षण आहे. म्हणूनच मग इच्छामरण मागण्याचे दारिद्र्य मनात उद्भवते.
आज माणूस, शतकोत्तर आयुष्यही, इतरांस उपयुक्त करून जगण्याची उमेद बाळगत आहे. अशावेळी इच्छामरण मागून मिळते हा भ्रम त्याने जोपासावाच का?