इच्छामरणाचा अधिकार कायद्याने दिला नसला तरी सावरकरांसारख्या (किंवा अर्नेस्ट हेमिंग्वे)खरोखरच निश्चयी व्यक्तींनी आपला अधिकार वापरला आहे असे दिसते‌.   प्रसिद्ध व्यक्तीच्या वागण्याकडे अनेक इतरेजनांचे लक्ष असते तरीही तो ते अधिकार बजावू शकले यावरून ज्या सक्षम व्यक्तीस इच्छामरण हवे असते तिला ते मिळणे अशक्य नाही हेच सिद्ध होते. प्रश्न केवळ लुळेपांगळे होऊन अंथरुणाला खिळलेल्यांचा आहे. त्यांना कसलीच इच्छा न उरल्याने त्यांच्या नातेवाइकांना कमी त्रास व्हावा एवढाच या कायद्याचा उपयोग होईल पण त्याचा दुरुपयोगही होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच कारणाने तसा कायदा होत नसावा.