मुळात कायदा करावयाची वेळ का यावी? मराठी माणसे आपल्या भाषेविषयी अजिबात आग्रही नाहीत. साधे बोलताना, लिहिताना सुद्धा मराठीमध्ये / मराठी ऐवजी हिंदी, इंग्रजीचा यथेच्छ वापर करतात.
त्यामुळे अन्य भाषा प्रेमींना वाटते इथे कोणतीही भाषा बोलली तरी हरकत नाही. ह्यावर उपाय एकच.
कटाक्षाने सर्वत्र मराठी बोलायचे / मराठी शब्द वापरायचे. उदा. ट्रॅफिक ऐवजी वाहतुक, ट्रॅफिक जाम ऐवजी
वाहतुक खोळंबा , (सोहळा) संपन्न झाला ऐवजी सूप वाजले, उग्रवादीच्या ऐवजी अतिरेकी इ. इ.
अश्याने कायदा करण्याची वेळच येणार नाही.