वरील प्रतिसादातील बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे. मात्र बहुसंख्य गिऱ्हाईक मराठी असताना मराठी पाट्या न लावण्यामागे काय कारण आहे ते कळत नाही. वर कर्नाटकाचे उदाहरण अनेकांनी दिले आहे. तामिळनाडूमध्येही तामिळ लिपीतील अक्षरचिन्हे ही इतरभाषिक अक्षरचिन्हांपेक्षा मोठी हवीत असा कायदा आहे असे ऐकले आहे. महाराष्ट्राचा 'मराठी लिपीतील अक्षरचिन्हे इतर लिप्यांतील अक्षरचिन्हांपेक्षा लहान नकोत' हा कायदा त्या तुलनेत बराच सौम्य म्हणावा लागेल