मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी फक्त मराठी माणूस या नात्याने हे लिहीले.
काही वर्षांपूर्वी मुंबईत नोकरीनिमित्ताने असतांना नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल चा मराठी पेपर) नावाच्या एका वर्तमानपत्रांत "वैऱ्याची रात्र आहे, मराठी माणसा जागा राहा", या सदराखाली हाच मुद्दा चर्चिला गेला होता.
त्यातही याबाबत मी लिहिले होते. फक्त आजच लिहित आहे असे नाही. जे अनुभवले होते तेच लिहिले होते. आजही त्याचे कात्रण माझेजवळ आहे. तेव्हा आणि आताही फक्त मराठी माणूस म्हणूनच मी हे लिहिले.
त्यावेळेस लिहिलेल्या संपादकांस पत्रात मी खालील एक प्रसंग सांगितला होताः
एका उत्तर भारतीय सहकाऱ्यासोबत मी मुंबईत राहात होतो. मी बाजूच्या रुममध्ये असतांना त्याचे रुममध्ये एकदा त्याचे काका सहज भेटायला आले होते, तेव्हा त्याने सहज चॅनेल बदलता चुकून झी मराठी लावले. (चुकून लागले). तेव्हा योगायोगाने "मुंबई ते मॉरिशस" हा मराठी सिनेमा लागला होता. तो म्हणाला की, "अरे, ये भुक्कड लोग (म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी), इनके पास इतना पैसा कैसे आ गया की मॉरिशस मे शुटींग करने गये? " मी त्याला काही म्हणणार तेव्हा त्याचे काकाच त्याला म्हणाले, "ऐसा मत समझ तू, मॉरिशस मे आधा महाराष्ट्र बसा हुवा है" काकानेच त्याची कान उघडणी केली. त्याला नंतर मीही झापले. सोडले नाही. ते असो.
थोडक्यात, त्यांची वृत्ती मराठी ला मुद्दाम कमी मानण्याची आहे. त्यावेळेस मी माझ्या पत्राचा शेवट असा केला होता की, "वैऱ्याची रात्र कधीच संपली असून वैऱ्याची पहाट उगावलीय, काळ्या दिवसाचा संदेश घेवून."
इतर पत्रलेखकांनीही अशा त्यांच्या व्रूत्तीवर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या.
असो.