घटम भिंद्यात पटम भिंद्यात कुर्यात .....
येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुशो भवेत ॥

या विशया वर खरे तर काहिही बोलू नये असेच माझे मत आहे. कारण यात बच्चन कुटुंबियांचाच फायदा आहे; तो म्हणजे अकारण प्रसिद्धी.
जिचा ते पुरेपुर फायदा घेतच असतात. 
आजकाल दिवस असे आले आहेत के तुम्ही खाली मान घालून इमान इतबारे आपले काम चोख बजाविणे हे अभिप्रेतच नाहि. पण अनेकानेक प्रसार माध्यमान्मध्ये जिथे तिथे नाक खुपसून स्वतः ला महान घोशित करून घेउ शकता.
इतकेच काय कि टीव्ही वर येणार्या सारेगमा सारख्या स्पर्धा मध्ये  सुद्धा लोकप्रियता हा निकश कारण नसताना घुसडिला आहे. सबब परत एका कारणाने बच्चन कुटुंबियाना लोकप्रिय करण्याचे पाप मम शिरसी मा लिख मा लिख अशि  मला प्रार्थना कराविशी वाटते.
म्हणून त्याना वाळित टाकणे खर तर बिनतोड उपाय आहे पण प्रसार माध्यमे (त्यात इंटर्नेट हे हि आलेच आणि मनोगत हि ) उपाशी मरतिल अश्या भीतिने त्याना अधिकाधिक प्रसिद्धी देतच असतात.