असे दिसून येते की ह्या साऱ्यापाठी बरेच मोठे राजकारण आहे. जया बच्चन ह्या कुशल राजकारणी आहेत व समाजवादी
पक्षाच्या खासदार आहेत. जर राज ठाकरे ह्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली तर काँग्रेस व स. पा. ह्या दोघांचाही फायदा आहे कारण राज शिवसेनेचाच मुद्दा चोरून शिवसेनेचीच मते खाणार आहे. म्हणूनच काँग्रेस सरकार राज यांना ढील देते आहे आणि जया बच्चन ह्या सवंग विधाने करीत आहेत.
तसेच काँग्रेस सरकारने आदल्या दिवशी राज यांच्यावर तथाकथित भाषणबंदी घातली आणि दुसऱ्याच दिवशी जया ह्यांनी
ही विधाने केली. काँग्रेस, सपा, मनसे ह्या सर्वांची युती असून हे सर्व लोक एकमेकांना तू मारल्यासारखे कर आणि
मी रडल्यासारखे करतो असे म्हणत आहेत.
काँग्रेस, सपा ही केंद्रात युती आहेच आता जोडीला मनसे येऊन मिळाली आहे. ह्या सर्वांत ना राज ठाकरेंना मराठी प्रेम
आणि ना जया बच्चन ह्यांना हिंदी प्रेम. ह्या डब्ल्यू डब्ल्यू ई ला आपल्यासारखी भोळी भाबडी जनता फसते.
वामन पंडित म्हणालेच आहेत,
उभा राहे एके, चरणी धरणी धरूनी ते,
तपश्चर्या वाटे करीत डोळे मिटूनी हा,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परी ज्ञाते तुझे कपट लवलाही उमगती...