राज ठाकरे व इतर पक्ष काय राजकारण करतील याचा नेम नाही आणि जी चुक शिवसेनेने केली ती चुक मनसे ही करेल यात शंका नाही परंतु हा (मनसे) पक्ष अजून स्थिरावलेला नाही आणि तो जम बसण्यासाठी त्याला असे मराठी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत.

 परंतु तरी ही मला असे वाटते की त्या प्रयत्नात जर मराठी माणसाचा फायदा होत असेल तर काहीही वाईट नाही. नाहीतरी आपण सगळ्या राजकारण्यांवर पाणीच सोडले आहे ते कुठे  कसे वागतील हे सांगता येणार नाही असे असले तरी आपल्याला मत देण्याचा अजुनही अधिकार आहे. त्यानुसार जर कुणालातरी मत देणारच आहोत (ज्या पक्षांना मत दिले त्यांनी  आतापर्यंत काय केले? ) मग एकदा मनसेवर विश्वास दाखवायला काही हरकत नाही.  बघुया हे काय करतात ते?

मराठी माणुसच जर याला राजकारण राजकरण म्हणून यावर दुर्लक्ष केले तर मराठी माणसाचे अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही.   नाहीतरी प्रत्येक राज्यात जोतो स्वतःच्या भाषेचे गोडवे गातो मग आपण का नाही?

जया बच्चन हीने अर्घे आयुष्य महाराष्ट्रात काढले तरी ती " मै युपी की हुं" असे म्हंणू शकते तेही महाराष्ट्रात! मग आपण अशा लोकांना साथ देतोय जे या राज्याचेच नाहीत! राज ठाकरेला जर आपणच विरोध केला तर एकाएकी आपण अमराठी लोकांनाच साथ देतोय म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून घेतोय.

हा मार्ग चुकीचा असला तरी मला वाटते की आपण मराठी माणसालाच साथ द्यायला हवी.