अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय हे एक हलकट प्रकरण आहे.
१. ट्याक्स वाचवण्यासाठी भारताचे नागरिकत्त्व सोडले आणि परत घेतले.
२. जमीन विकत घेण्यासाठी शेतकरी असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली.
३. प्रकरण अंगलट येताच ती जमीन दान केली आणि काही दिवसांनी दान परत मागितले.
४. एबीसीएल कंपनीने ष्टार बनवतो असे सांगून लाखो तरुणांकडून पैसे घेतले होते. त्याचा हिशेब पुढे दिलाच नाही. नंतर त्या कंपनीची दिवाळखोरी जाहीर केली.
५. अमिताभ सर्वेसर्वा असलेल्या आणि 'भारतीय' चित्रपट जगाला दाखवण्यासाठी सुरू झालेल्या आयफाच्या कार्यक्रमांमध्ये 'भारतीय' चित्रपट म्हणून फक्त बॉलीवूडचाच उल्लेख कित्येक वर्षे होतो आहे. या कार्यक्रमांमध्ये फक्त बॉलीवूडचे कलाकार नाचवतात. (बॉलीवूडपेक्षा अनेक चांगले चित्रपट बनवणारी - आणि प्रचंड आर्थिक उलाढाल असलेली - तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टी, अनेक चांगले चित्रपट बनवणारी मराठी, बंगाली चित्रपटसृष्टी जणू काही अभारतीयच आहेत. ) अर्थात ह्या गोष्टीवरून मामूटी यांनी कार्यक्रमातच जाहीरपणे थोबाडल्यावर असल्या स्वतंत्र बाण्याच्या दक्षिणेतील कलाकारांना तिथे बोलावले जात नाही हा भाग निराळा!
आणि हे सर्व प्रकार करणारा अमिताभ हा भारतीय संस्कृतीचा आणि भारताचा परदेशातील राजदूत मानला जातो.
सध्या चालू असलेले प्रकरण या हलकटपणाचेच आणखी एक उदाहरण आहे. राज ठाकरे यांचे मराठीप्रेम किती आणि कसे आहे, खरे आहे की राजकारणी आहे, याच्याशी मला देणेघेणे नाही. मात्र मराठीत फलक असावेत, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे आणि जया बच्चन या मुद्द्यांवर त्यांना पाठींबा.
जिथे राहतो तिथल्या लोकांशी प्रेमाने वागावे, तिरस्कार करू नये, जाणूनबुजून त्यांना हिणवू नये इतकाही कॉमनसेन्स नसलेली ही बाई जाहीरपणे असे हिणकस उद्गार काढते - आणि आपले मुख्यमंत्री 'जयाबाईं काही वाईट बोलल्या नाहीत. लातूरमध्ये कोणाला हिंदी येत असेल तर त्याने बिनधास्त फक्त हिंदीतच बोलावे असे सांगतात - हा सर्व प्रकार लज्जास्पद आहे.
अर्थात हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. गुजरात, बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ अशा कोणत्याही राज्यात स्थानिकांशी असे वागलेले खपवून घेतले जात नाही.