जिथे राहतो तिथल्या लोकांशी प्रेमाने वागावे, तिरस्कार करू नये, जाणूनबुजून त्यांना हिणवू नये इतकाही कॉमनसेन्स नसलेली ही बाई जाहीरपणे असे हिणकस उद्गार काढते - आणि आपले मुख्यमंत्री 'जयाबाईं काही वाईट बोलल्या नाहीत. लातूरमध्ये कोणाला हिंदी येत असेल तर त्याने बिनधास्त फक्त हिंदीतच बोलावे असे सांगतात - हा सर्व प्रकार लज्जास्पद आहे.

हा प्रकार त्यांना नव्हे, आपल्याला लज्जास्पद आहे. कारण "हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. गुजरात, बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ अशा कोणत्याही राज्यात स्थानिकांशी असे वागलेले खपवून घेतले जात नाही". हे त्यांनाही माहिती आहे, म्हणूनच हे असे वागणे. खरे तर राज ठाकरेंनी 'भय्यांच्या ज्या दादागिरी'च्या विरोधात मोहीम उघडली आहे, त्याचे हे प्रात्यक्षिक होते.