आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल कसलेही ठोस मतप्रदर्शन न करता, नुसतीच सगळी जंत्री थोड्याश्या 'वेगळ्या' पद्धतीने तथाकथित कवितेत लिहीणे, ह्यापलिकडे ह्या 'साहित्याला' काही अर्थ नाही. आणि आता हे असे करणे हीच एक फॅशन होऊन बसलेली दिसते. नशीब एव्हढेच, ह्या 'कवितेत' कुठेही गणपतिबाप्पांना आणलेले नाही. तेव्हढ्यानेच समाधान मानून घेऊया, आणि वाचकहो, आम्हीही म्हणूया 'हय्या हो!!'