जिथे दोन मराठी एकमेकाला ' क्या यार किधर है तु?' असे कौतुकाने म्हणतात तिथे परके काय सोडणार आपल्याला? मराठी माणुस प्रचंड परधार्जिणा! याचा अचूक फायदा परके घेणारच.

अशा कृत्याचा निषेध केला तर आपल्यावर संकुचित मनोवृत्तीचे अशी टिका करण्यात मराठी माणसेच असणार.

साधी गोष्ट लक्षात घ्या. मराठी माणसाचे हिंदी या विषयी टिंगल करणारे जितके साहित्य मराठी माणसाने प्रकाशित/ प्रसिद्ध केले आहे तितके ते कुण्या अन्या भाषिकाने मराठी वा स्वतःच्या व अन्य कोणत्याही भाषेवर केलेले नसावे. मी अन्य भाषिकांना विचारून पाहिले पण तामिळ्यांचे तेलगू वा पंजाब्यांचे बंगाली वा कन्नडांचे हिंदी असे उपहासलेख अन्य कोणत्याच भाषेत आढळून आले नाहीत.

ज्या दिवशी समस्त मराठी माणसे जागृत होऊन व रस्त्यावर एकत्र येऊन असल्या मुजोरांना जाब विचारतील तेव्हाच ते मुजोर पळ काढतील.