मराठी माणसाच्या वृत्तीवर नेमके बोट ठेवले आहे. त्याबाबत सहमत. मात्र तामिळ्यांचे तेलगू वा पंजाब्यांचे बंगाली वा कन्नडांचे हिंदी असे लेखन होणे हे सामान्यच आहे. किंबहुना धारवाडकडील कानडी आणि मैसूरूकडील (शुद्ध) कानडी यांमधील भांडणे जगप्रसिद्ध आहेत. तेलगू लोकांचे तमिळ याबाबतही प्रचंड उपहास केला जातो. एकमेकांची टिंगलटवाळी करण्यात कोणतेच भाषिक मागे नाहीत. मात्र स्वभाषेचा न्यूनगंड आणि भाषेकडे दुर्लक्ष करणारे राज्यसरकार हे निराळेच मिश्रण मराठीच्या बाबतीत आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळी लोकांना अशी पाट्यांसाठी आंदोलने करावी लागत नाहीत. तिथे राज्यसरकार भाषेसाठी योग्य ते निर्णय घेते.