सकाळ मधला लेख येथे पूर्ण दिल्याबद्दल आभारी आहे. हल्ली वेळेअभावी सर्व वाचन पूर्ण होतेच असे नाही. म्हणून दुवा दिला असतात तर 'नंतर वाचू' ह्या विचाराने वाचन राहून गेले असते.
लेख समर्पक आहे ह्यात वादच नाही. सर्वांगी विचार करून लेखाचे संकलन केल्याचे बघून कौतुक वाटले. शोकांतिका ही आहे की हल्ली मराठी वर्तमानपत्रांत ही परखडपणे मराठीची बूज राखण्यास संपादक मंडळी कचरतात. ह्या कल्पनेला सकाळ ने तडा दिल्याचे बघून कौतुक वाटले.
दुःख एकच आहे की शरद पवारांपासून ते सर्वच ज्येष्ठ राजकारण्यांची चामडी आता निबर झाली आहे व ते ग्लोबलायझेशन च्या मागे लागले असून त्यांनी आपल्या मातीशी व पर्यायाने मातेशी नाळ तोडली आहे की काय अशीच शंका येते.
विलासराव देशमुख प्रत्येक आंदोलन 'लाइट' ली व गोडं हसून घेतात पण जेव्हा निवडणुकांचे निकाल हाती येतील व त्यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागेल तेव्हा ह्या छोट्या गोष्टींची खरी किंमत त्यांना कळेल.